![rahul narwekar](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/rahul-narwekar.webp?fit=1024%2C576&ssl=1)
मुंबई : Vidhan Bhavan | अधिवेशन काळात विधानभवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होते (Maharashtra Monsoon Session). कार्यकर्ते पदाधिकारी सर्रासपणे विधानभवन परिसरात दिसत होते. पण आता या सर्वांसाठी दरवाजे बंद होणार आहेत. तसा निर्णय सरकारने घेतला आहे. अधिवेशन काळात कधीही आणि कोणालाही प्रवेश मिळणार नाही. मात्र आठवड्यातून दोन दिवस प्रवेश देण्यात येईल. ते वार कोणते असतील त्याबाबतही घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली आहे.
विधानभवनाच्या व्यवस्थापनावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवस अधिवेशन काळात विधान भवनात सर्व सामान्यांना प्रवेश दिला जाईल. याबाबतची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. या घोषणेमुळे विधानभवनात होणारी गर्दी आता कमी होणार आहे. अधिवेशन काळात नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसत होते. याला आता कुठेतरी पायबंद असणार आहे. (Vidhan Bhavan)
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Baramati Firing Case | बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू,
सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या होत्या गोळ्या