पुणे: Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड असा दौरा केला होता. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा यावेळी पवारांकडून घेण्यात आला. दरम्यान या भागातील काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही टंचाई दिसून आली. याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात म्हंटले आहे की , “अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत.
मात्र दौऱ्यावेळी शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या, सदर समस्या आणि मागण्यांबाबत प्रकल्प निहाय व ग्रामनिहाय स्वतंत्र टिप्पणी सोबत जोडली आहे. कृपया टिप्पणीचे अवलोकन व्हावे.” (Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde)
पवार पुढे म्हणाले की, “पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
यासाठी आपणास विनंती की, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व
जलसंधारणमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे.
बैठकीत संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रीत करावे.
सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणून करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी.
तसेच कायस्वरूपी उपाययोजनेसंदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो “. असे शरद पवार यांनी पत्रात म्हंटले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
EC On EVM Machine | EVM कोणत्याही OTP ने होत नाही अनलॉक, ना कोणत्याही डिव्हाईसशी कनेक्ट,
हॅकिंगचे आरोप EC ने फेटाळले
Sassoon Hospital | ‘ससून’चे काम पारदर्शक होणार? कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे पाऊल
Sharad Pawar NCP | चिंचवड विधानसभे संदर्भात शरद पवार गटाकडून जगताप कुटुंबाला मोठी ऑफर