मुंबई : Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदारातून केला आहे. भाजपा नेते नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवासाठी सुद्धा असेच प्रयत्न झाल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, नागपूरमध्ये (Nagpur Lok Sabha) नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी यांनी एकत्रित प्रयत्न केले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut On Ajit Pawar)
संजय राऊत यांनी रोखठोक सदरात म्हटले आहे की, ४ जूननंतर भाजपात मोदी-शहांना (Modi-Shah) पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.
या लेखात पुढे म्हटले आहे की, जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली
तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना घरी पाठवतील.
त्यामुळे योगी को बचाना है, तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला.
उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल.
आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Monsoon Update | मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; जोरदार पावसाची शक्यता