मुंबई : Prithviraj Chavan On Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यानंतर अनेक निवडणूक अंदाज समोर येऊ लागले आहेत. भाजपाला (BJP) देशात बहुमत मिळणार नाही, असे कालच राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी म्हटले होते. तर राज्यातील स्थितीबाबत आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या ३ ते ४ जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून येतील असा अंदाज चव्हाण यांनी वर्तवला आहे. ते एका दैनिकाला मुलाखत देताना बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपाला पुन्हा सत्ता मिळणे कठीण असल्याचे विविध राज्यांमधून आढावा घेताना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. देशात एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवास येत आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. राज्यातील ३२ ते ३५ जागा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) निवडून येतील.
पृथ्वराज चव्हाण म्हणाले, चारसो पार चा नारा हा संविधान बदलासाठी आहे, त्यामुळे दलित समाज विशेषत: आंबेडकरी समाज भाजपच्या विरोधात गेला आहे. या वेळी भाजपच्या विरोधात दलित-मुस्लीम एकत्रीकरण झाल्याचे दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एमआयएमबरोबर युती होती, त्यामुळे त्यांना सहा टक्के मते मिळाली होती. या वेळी युती नसल्याने वंचितची मते कमी होतील. (Prithviraj Chavan On Ajit Pawar NCP)
पृथ्वराज चव्हाण म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती आहे,
त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. या निवडणुकीत भाजपच्या विरोधात महागाई,
बेरोजगारी, आर्थिक गैरव्यवहार, नैतिक भ्रष्टाचार आणि शेवटचा मुद्दा संविधान बचाव हे मुद्दे
या निवडणुकीत प्रभावी ठरत आहेत.
विशेष म्हणजे या पाचही मुद्द्यांवर मोदी स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असे चव्हाण म्हणाले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड
Pune Collector Dr Suhas Diwase | मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात (मोबाईल, कॉडलेस फोन,
पेजर, वायरलेस फोन वर बंदी) प्रतिबंधात्मक आदेश (Video)