![Rain](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/03/Rain.webp?fit=1024%2C576&ssl=1)
दिल्ली : Monsoon Update | मान्सूनच्या आगमनाबाबत आता मोठी उपडेट समोर आली आहे. राज्यासह देशभरातच लवकरच मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाकडून India Meteorological Department (IMD) सांगण्यात आले आहे. पुढील २४ तासात मान्सून केरळात दाखल होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने म्हंटले आहे.
केरळात यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे. राज्यात मान्सून सर्वसाधारण १ जूनपर्यंत दाखल होतो. यात कधी कधी ३ – ४ दिवस पुढे किंवा मागे होऊ शकते. हवामान खात्यानुसार, ३० मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होईल. त्यानंतर राज्यात जोरदार पाऊस पडेल.
केरळात आधीच मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. केरळात प्री मान्सून लवकरच मान्सून पावसात बदलेल असे IMD ने म्हंटले आहे. IMD ने कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात रेड अलर्ट आणि तीन राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अहवाल देण्यात आला होता.
या अहवालानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे,
यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो.
तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD) परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे,
हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत असे हवामान विभागाने म्हंटले आहे. (Monsoon Update)
कोणत्या राज्यात कधी पाऊस येणार ?
अंदमान निकोबार – २२ मे
बंगालची खाडी – २६ मे
केरळ, तामिळनाडू – ३० मे, १ जून
कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसामच्या काही भागात – ५ जून
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या वरच्या बाजूस, पश्चिम बंगाल – १० जून
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झार खंड आणि बिहार – १५ जून
गुजरात, मध्य प्रदेशातील काही भागात, उत्तर प्र देशातील बहुतांश जिल्ह्यात – २० जून
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्त राखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर – २५ जून
दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब – ३० जून
राजस्थान – ५ जुलै
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
UPI Payment | HDFC बँकेचा मोठा निर्णय, आता इतक्या रुपयांपेक्षा कमी असेल UPI व्यवहार तर येणार नाही SMS अलर्ट, जाणून