![eknath khadse](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/eknath-khadse.webp?fit=1024%2C576&ssl=1)
मुंबई : Eknath Khadse On Maharashtra Budget | आज अजित पवारांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. या अर्थसंकल्पावरून भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला आहे. वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. घोषणा चांगल्या आहेत. मात्र आता वेळ नाही. सध्या राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार? अशी टीका एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खडसे यांनी राष्ट्रवादीशी असलेला घरोबा मोडून पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. परंतु निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करून न घेता निवडणूक निकालानंतर प्रवेश होईल, असे दिल्लीतील पक्षनेतृत्वाने त्यांना सांगितले. निकाल लागून जवळपास महिना उलटला तरी त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही.
कालच खडसे यांनी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
नव्यांना पक्षात संधी मिळते मात्र आपल्याला थांबा थांबा सांगतात हे अतिशय वाईट आहे,
असे म्हणत आपल्या मनातील खदखद खडसेंनी बोलून दाखवली होती.
पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहरून आलेल्यांना पायघड्या टाकण्याच्या भाजपच्या धोरणांवर
एकनाथ खडसेंनी याअगोदरही टीका केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Reliance Jio Hikes Tariff | मुकेश अंबानी यांनी दिला जोरदार झटका, 25% पर्यंत महागले
Jio चे रिचार्ज प्लान, जुलैपासून वाढणार मोबाईल बिल