मुंबई: CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यातील जनतेला विविध तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवण्यासाठी सरकारने योजना आणण्याची लक्षवेधी विधानसभेत मांडली. यावर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले. त्यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. विधानसभेच्या प्रांगणात मागील दोन दिवसांपासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलने सुरु आहेत.
यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही जंग जंग पछाडले पण काय फायदा झाला नाही, सत्तेत मोदी आलेत. तुम्ही लोकसभेचा कशाला आनंद करता, हारलेले लोक पेढे कसे वाटताय, तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद संसदेत मिळाले म्हणून पेढे वाटताय का? असे म्हणत शिंदेनी विरोधकांना डिवचले आहे. यावर सभागृहात विरोधकांनी गदारोळ सुरु केला आहे.
“अर्थसंकल्प पाहून काल विरोधकांचे चेहरे पांढरेफिकट झाले होते. कारण सरकारने सगळ्या घटकांना न्याय दिला. खोटे नॅरेटिव्ह पसरवून तुम्ही लोकसभा जिंकलात मग इतके फुगलात की विधानसभा जिंकली असे समजलात पण कालच्या अर्थसंकल्पाने विरोधकांचा सुपडासाफ झाला. दोन वर्षात महायुतीने निर्णय घेतले ते लोकहिताचे आहेत” असे शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi)
ते पुढे म्हणाले ,” एवढे करुनही पंतप्रधान पदापासून तुम्ही मोदींना रोखू शकला नाहीत,
मी काही लपूनछपून करत नाही दोन वर्षापूर्वी समोरासमोर केले आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली,
ज्यांची खोटे बोलून मते घेतली ती परत आता आमच्याकडे आलेत”, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.
तसेच त्यांनी काल अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावरही भाष्य केले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Baramati Firing Case | बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू,
सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या होत्या गोळ्या